टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : टाकळी हाजी ता शिरूर येथील साबळेवाडी गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असुन ते काढण्यात यावा या मागणीसाठी माहीती अधिकार कार्येकर्ते संतोष मोहन साबळे यांनी सोमवार दि ३ एप्रिल पासुन टाकळी हाजी ता शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे .
या बाबत संतोष साबळे यांनी तहशिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन , ग्रामपंचायत टाकळी हाजी ता शिरूर यांना त्यांनी वेळो वेळी निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी ते गेली तीन वर्षापासुन करीत आहे . त्यांच्या मागणी नुसार शिरूर भुमी अभिलेख कार्यालयाने या क्षेत्राची मोजणी केली आहे . त्यानुसार अतिक्रमण येथील साबळेवाडी येथील गावठाण हददीत मोठ्या प्रमानात अतिक्रमण झाले आहे हे सिद्ध झाले असुन, हे अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे . तसेच राजकीय वरदहस्तामुळे अतिक्रमण धारकाला पाठीशी घातले जात आहे . गावात अश्याच प्रकारे अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमणे करीत जागा लाटल्या असुन, गावा बाहेरील लोकानीही येऊन अतिक्रमणे केलेले आहे . अनिक्रमण काढण्यासाठी केलेल्या उपोषणाला मोठ्या प्रमानात ग्रामस्थांचा पांठीबा मिळत आहे . जिल्हा परीषद सदस्या सुनिताताई गावडे,घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक राजेंद्रदादा गावडे, बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात, माजी सरपंच दामुशेठ घोडे, भाऊसाहेब महाराज चोरे, माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, बाबाजी रासकर, दत्तात्रय मुसळे, सोनभाऊ मुसळे, गुरुकुल शिक्षक संघ, वारकरी मंडळ गावातील अनेक सामाजिक संस्था तसेच तरुण वर्गाने पांठीबा दिला आहे ..