शिरूर ( वृत्तसेवा ) – नववर्षाची सुरुवात देव दर्शन घेऊन देवांच्या आशीर्वादाने करू असा संकल्प मनी बांधून देवाचा आशीर्वाद घेऊन
परतलेल्या आमदाबाद तालुका शिरूर येथील त्या चार जणांसाठी ते शेवटचे देवदर्शन ठरले . त्यांच्या मदतीतीला का नाही धावला रे देवा अशी तिव्र प्रतिक्रिया कुटुंबातील बायाबापडे व्यक्त करीत आश्रुंचा बांध मोकळा करीत आहेत .
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शन करूण परतलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांच्या गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे , या दुर्देवी घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे .
आमदाबाद ता शिरूर येथील गुढीपाढवा असल्यामुळे येथील तरुणांनी गाडी भाड्याने घेऊन देव दर्शनाचा बेत आखला होता . भाविक बुधवारी ( दि.२२) देवदर्शनासाठी देवगड व शनी शिंगणापूर येथे गेले होते.देवदर्शन करून परतत असताना रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे -नगर महामार्गावर सुपे ते कामरंगाव च्या दरम्यान चौधरी ढाब्याजवळ कंटेनर आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर भाविकांच्या गाडीवर आदळला असून कंटेनरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांना हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आले . भाविकांच्या गाडीत १७ लोक होती त्यातील चार जनांचा मृत झाला असुन इतर सात लोक जखमी झाल्यांने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटल मधे उपचार सुरु आहे .
अपघातात आमदाबाद येथील राजेंद्र विष्णू साळवे (वय ३३ वर्ष), विजय राजेंद्र अवचिते (वय २६ वर्षे), धीरज अजय मोहिते (वय १२ वर्षे), मयुर संतोष साळवे ( वय २५ वर्षे), यांचा मुत्यू झाला असून, तीन गंभीर तर सात जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर अ.नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे.
घटना समजताचं गावातील कार्यकत्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे माजी चेअरमन अशोक माशेरे , माजी सरपंच योगेश थोरात यांनी सांगितले. मृत चार तरुणाच्या वर आमदाबाद येथे अंतविधी करण्यात आला . या वेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यांचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, विश्वास कोहकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुदकर, घोडगंगाचे संचालक सुहास थोरात, सोपानराव भाकरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे,माजी सरपंच योगेश थोरात, सरपंच लिलाबाई पवार, उपसरपंच कांताराम नरहे, माजी चेअरमन अशोक माशेरे यांच्यासह मोठ्या प्रमानात जनसागर अंतविधीसाठी उपस्थित होता . या घटनेबद्दल विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार अशोकराव पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दुःख व्यक्त केले .